वृक्षतोड- प्रदूषण -शहरीकरण यामुळे सातत्याने होत आहे वाढ, या पुढच्या काळातही विदर्भात तापमान वाढतेच राहणार असल्याचा तज्ञांचा अंदाज
गेल्या शंभर वर्षात पहिल्यांदाच मार्चच्या पहिल्या आठवड्यात तापमान 40 डिग्री पार नोंदले गेले आहे. विदर्भातील अकोला, नागपूर, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये तापमानाने उसळी घेतली आहे. वृक्षतोड- प्रदूषण -शहरीकरण यामुळे सातत्याने तापमानात वाढ होत आहे. या पुढच्या काळातही विदर्भात तापमान वाढतेच राहणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे.
